२ जी मुद्याचा संपुआच्या स्थैर्यावर प्रभाव पडणार नाही - शरद पवार
स्रोत: तरुण भारत
ठाणे, १ ऑक्टोबर - २ जी स्पेक्ट्रम परवाना वाटप घोटाळ्याचा जो वाद सध्या सुरू आहे त्यातील तथ्ये समोर मांडण्यासाठी केंद्र सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून या मुद्याचा कॉंगे्रसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील संपुआ सरकारच्या स्थैर्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. खरे तर २ जी स्पेक्ट्रम प्रकरण वाजवीपेक्षा फुगवून दाखविण्यात येत असून यातील सत्य ज्यावेळी समोर येईल त्यावेळी प्रत्येकालाच त्यातील खरेपणा समजून येईल, असे पवार पुढे म्हणाले. हे प्रकरण लवकरात लवकर संपविण्यासाठी कॉंगे्रस पक्ष योग्य दिशेने प्रयत्न करीत आहे. केंद्रातील संपुआ सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या स्थानिक नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवार येथे आले असता काल रात्री ते पत्रकारांशी बोलत होते. २ जी स्पेक्ट्रमवरून पी चिदम्बरम व प्रणव मुखर्जी यांच्यात सुरू असलेल्या वादासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण प्रसिध्दी माध्यमांनी वाजविपेक्षा फुगविले आहे.
स्रोत: तरुण भारत
ठाणे, १ ऑक्टोबर - २ जी स्पेक्ट्रम परवाना वाटप घोटाळ्याचा जो वाद सध्या सुरू आहे त्यातील तथ्ये समोर मांडण्यासाठी केंद्र सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून या मुद्याचा कॉंगे्रसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील संपुआ सरकारच्या स्थैर्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. खरे तर २ जी स्पेक्ट्रम प्रकरण वाजवीपेक्षा फुगवून दाखविण्यात येत असून यातील सत्य ज्यावेळी समोर येईल त्यावेळी प्रत्येकालाच त्यातील खरेपणा समजून येईल, असे पवार पुढे म्हणाले. हे प्रकरण लवकरात लवकर संपविण्यासाठी कॉंगे्रस पक्ष योग्य दिशेने प्रयत्न करीत आहे. केंद्रातील संपुआ सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या स्थानिक नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवार येथे आले असता काल रात्री ते पत्रकारांशी बोलत होते. २ जी स्पेक्ट्रमवरून पी चिदम्बरम व प्रणव मुखर्जी यांच्यात सुरू असलेल्या वादासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण प्रसिध्दी माध्यमांनी वाजविपेक्षा फुगविले आहे.



0 comments:
Speak up your mind
Tell us what you're thinking... !