कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे - HINDU POST
Headlines News :

राष्ट्रीय

Latest Resource

Home » , , » कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे

कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:06 AM

मुंबई - मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याच्या मागणीवरून आज शिवसेना, भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्वच विरोधकांनी टीकेचे रान उठविले. मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात घालू, असा सडेतोड इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकीकडे दिला; तर हे पिल्लू ज्याने कोणी सोडले तो पुढे येऊ दे, मग मी बोलतो, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. भाजप लोकशाही मार्गाने या मागणीस विरोध करेल, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मागणीला ठाम विरोध दर्शविला असून, मुंबई महापालिकेच्या विभाजनाची आवश्‍यकता नसल्याचे ठाम मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई महापालिकेचे शहर व उपनगर असे विभाजन करावे व उपनगरासाठी स्वतंत्र आयुक्त नेमावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काल सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या साक्षीने करण्यात आलेल्या या मागणीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. आज यावर सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दात घशात घालू - उद्धव ठाकरे
कॉंग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे या मागणीवरून सिद्ध होते. कॉंग्रेसच्या नेत्यांशीच लढून मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. आज संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात कॉंग्रेसकडून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव. कॉंग्रेसचा हा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कॉंग्रेसचे हे दात घशात घातल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी टीकेची झोड शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उठविली.
मुंबईचे पालकत्व एकाच संस्थेकडे ठेवायला हवे हे आम्ही खूप वर्षांपासून सांगत आलो आहोत. मुंबईतील सर्व बाबींसाठी जर महानगरपालिकेला जबाबदार धरले जात असेल, तर महानगरपालिकेला तसे अधिकारही द्यायला हवेत. याउलट एमएमआरडीएसारख्या संस्था महानगरपालिकेच्या डोक्‍यावर राज्य करतात. कॉंग्रेसची ही पद्धत आहे, की एखाद्या छोट्या माणसाकडून पुडी सोडायची आणि क्रिया-प्रतिक्रिया काय होतात ते पाहायचे. कॉंग्रेसचा मुंबई महाराष्ट्रापसून तोडण्याचा हा डाव मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

Blogroll

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU POST - All Rights Reserved
Original Design by Creating Website Modified by Adiknya